धनश्री भावसार-बगाडे
महिलांना मासिक पाळी दरम्यान काही गोष्टी न करण्याचा सल्ला दिला जातो. त्यापैकी एक म्हणजे चहा पिणे.
पाळीत चहा पिऊ नये असे सांगण्यात येते. कारण त्यामुळे अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
पाळीत चहा प्यायल्याने काय नुकसान होते, त्याची कारणं काय जाणून घेऊया.
चहामध्ये कॅफेन असते. कॅफेनच्या प्रमाणामुळे तणाव वाढू शकतो. आणि पाळीच्या काळात महिलांच्या स्ट्रेस लेव्हलमध्ये वाढ होऊ शकते.
पाळीच्या काळात महिलांना गॅस आणि अपचनाची समस्या होऊ शकते. त्यात चहाच्या कॅफेनमुळे भर पडू शकते.
चहामधील काही घटकांमुळे पाळी दरम्यान पोट दुखी वाढू शकते.
पाळीच्या काळात महिलांमध्ये हार्मोनल बदल होत असतात. त्यावेळी त्यांना अधिक पोषण आहाराची गरज असते. पण चहाने भूक मरते. शिवाय त्यातून कोणतेही पोषणतत्व मिळत नाहीत.
झोपेमध्ये व्यत्यय येऊ नये आणि उर्जेची पातळी कमी होऊ नये म्हणून पाळीच्या काळात कॅफेनयुक्त पेय घेणे टाळावे.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.