तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने अनेक आजार राहतात दूर...

Aishwarya Musale

तांब्याचं भांडं

धातूच्या भांड्यात खाणं-पिणं शरीरासाठी फायदेशीर असल्याचं प्राचीन काळापासून मानलं जातं त्यातही तांब्याचं भांडं अतिशय शुद्ध समजलं जातं.

अनेक घरांमध्ये लोक तांब्याच्या भांड्यातून पाणी पित असतात. पण असं केल्यास आरोग्याला नेमका काय फायदा होतो, हे तुम्हाला माहित आहे का?

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. यामुळे शरीरातील तांब्याची कमतरता भरुन निघते.

कावीळ

तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी शुद्ध मानलं जातं. हे पाणी जुलाब, कावीळ, अतिसार यांसारखे अनेक आजार पसरवणाऱ्या जिवाणूंना नष्ट करतं.

कोलेस्टेरॉल

तांब्यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे शरीराला वेदना, वात आणि सूज येत नाही. अमेरिका कॅन्सर सोसायटी या संस्थेच्या मते, तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करते.

हिमोग्लोबिन

तुम्ही दररोज तांब्याच्या भांड्यातले पाणी प्यायलात तर ते हिमोग्लोबिन तयार करण्यास आणि शरीरातील लोह शोषण्यास मदत करते. ज्यामुळे तुमच्या शरीरातील अशक्तपणाची तक्रार दूर होते.

त्वचा साफ आणि चमकदार

तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्याने त्वचेवर कोणत्याही प्रकारची समस्या होत नाही. तसंच त्वचा साफ आणि चमकदार होते. 

सांधेदुखी

तांब्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे सांधेदुखीच्या वेदना दूर करण्यास मदत करतात.

या 5 गोष्टी खाल्ल्याने होऊ शकते केस गळती...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.