रोज उपाशीपोटी 4 काजू खाण्याचे फायदे, जाणून घ्या

Aishwarya Musale

रिकाम्या पोटी

काजूमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. तुम्हाला माहित आहे का की जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी काजू खाल्ले तर ते तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे देतात. 

ऊर्जा

काजू हे ऊर्जा प्रदान करते म्हणून त्यास ऊर्जेचे घर म्हणतात. आपण त्याचा वापर मिठाई, भाज्या, चटणी, पुलाव आणि पदार्थ इत्यादींमध्ये करतो. 

त्वचा चमकदार होते

काजूमध्ये प्रथिने जास्त प्रमाणात आढळतात, म्हणून ते खाल्ल्याने केस आणि त्वचा निरोगी आणि सुंदर बनते. सौंदर्य वाढवण्यासाठी घरगुती उपायांमध्ये याचा वापर केला जातो.

कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते

काजू कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतो. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते आणि ते लवकर पचते. काजू हा लोहाचा चांगला स्रोत मानला जातो, त्यामुळे तुम्ही अशक्तपणावर मात करण्यासाठी ते खाऊ शकता.

हाडे मजबूत करते

काजूमध्ये उच्च प्रथिने असतात ज्यामुळे हाडे मजबूत होतात. काजूमध्ये असलेले मोनोसॅच्युरेटेड फॅट हृदय निरोगी ठेवते आणि हृदयविकाराचा धोका कमी करते.

स्मरणशक्ती तीक्ष्ण होते

काजू हे व्हिटॅमिन बी चा खजिना आहे. रिकाम्या पोटी काजू आणि मध खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते. काजू खाल्ल्याने यूरिक अॅसिड तयार होण्याचे थांबते आणि त्याच्या सेवनाने रक्तदाबही नियंत्रणात राहतो.

हृदयविकार

काजू कर्करोग, हृदयविकार, रक्तदाब, केस, हाडे आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. काजू हा ऊर्जेचा चांगला स्रोत मानला जातो.

पचनक्रिया

काजूमधील अँटी-ऑक्सिडंट्स पचनक्रिया मजबूत करतात आणि वजनही संतुलित ठेवतात.

डायबिटीस असलेल्या रूग्णांनी कांदा खावा की नाही? जाणून घ्या…

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.