धनश्री भावसार-बगाडे
श्रावणात केल्या जाणाऱ्या व्रतवैकल्यांना आणि धार्मिक सण-समारंभांना गुळ-फुटाणे वाटण्याचे, नैवद्य ठेवण्याची पद्धत आहे.
श्रावणात हळद-कुंकू, मंगळागौरीचे आयोजन केले जाते. यावेळी येणाऱ्या महिलांनाही गुळ-फुटाणे देण्याची पद्धत आहेत.
गुळ-फुटाणे पावसाळ्यात खाण्यामागे आरोग्याविषयीचे भरपूर फायदे आहेत.
गुळ-फुटाणे खाल्ल्याने हिमोग्लोबीनची कमतरता भरून निघते. त्यामुळे अॅनमिया असणाऱ्यांसाठी ते उपयुक्त ठरते.
पावसाळ्यात बहुतेकांना सर्दी खोकल्याचा त्रास होतो. यावर गुळ-फुटाणे खाणे उपयुक्त ठरते.
फुटाण्यातून कॅल्शियम आणि प्रोटीन्स भरपूर प्रमाणात मिळते.
पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते. अशावेळी बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. पण गुळ-फुटाणे खाणे उपयुक्त ठरते.
गूळ आणि फुटाणे एकत्र करून खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.