हैद्राबाद संस्थानामध्ये धुमाकूळ घालणारे रझाकार कोण होते?

कार्तिक पुजारी

भारत स्वतंत्र

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, पण देशात असेही काही प्रदेश होते जेथे तिरंगा फडकवला जाणं गुन्हा होतं.

निजामाचंच राज्य

तो प्रदेश होता हैद्राबाद संस्थान.त्यावेळी हैद्राबादवर निजामाचंच राज्य होतं.

लढाही सुरु

निजाम मीर उस्मान अली खान हैद्राबाद संस्थानावर राज्य करत होता. त्याला भारतात सामील व्हायचं नव्हतं आणि त्यानं त्यादृष्टीने लढाही सुरु केला होता.

८० टक्के हिंदू

हैद्राबाद संस्थानात त्यावेळी लोकसंख्या जवळपास १ कोटी ६० लाख इतकी होती. यातील जवळपास ८० टक्के हिंदू होते.

सय्यद कासीम रझवी

निजाम मीर उस्मान याचा सय्यद कासीम रझवी याला पाठिंबा होता. हा कासीम रझवी मजलीसे इत्तेहादूल मुस्लमिन ही राजकीय संघटना चालवायचा.

रझाकार

ही एक खाजगी लष्करी संघटना होती. संघटनेच्या कार्यकर्त्यांना रझाकार असं म्हटलं जायचं. हे रझाकार हैद्राबाद संस्थान आणि सीमा भागातील हिंदूंवर अत्याचार करायचे.

कुख्यात

हत्या करणे, महिलांवर बलात्कार करणे, घरे लुटणे आणि दहशत माजवण्यासाठी रझाकार हे कुख्यात होते. हिंदू जनता हैद्राबाद संस्थानात राहण्यास त्रासली होती.

ऑपरेशन पोलो

अखेर सरदार पटेल यांनी हैद्राबाद भारतात विलीन करण्याचा निर्णय घेतला. १३ सप्टेंबर १९४८ रोजी हैद्राबादमध्ये ऑपरेशन पोलो सुरु करण्यात आले.

विलिन

१७ सप्टेंबर १९४८ रोजी अखेर हैद्राबाद संस्थान भारतामध्ये विलिन झालं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

marathwada libration day razakar