सकाळ ऑनलाईन
बाईक आता केवळ चैनीचं साधन राहिलेलं नाही, ती एक वेळ वाचवणारं साधन बनलं आहे.
त्यामुळं बाईकची काळजी घेणं खूपच गरजेचं आहे. त्यासाठी वेळोवेळी सर्व्हिसिंग करणं गरजेचं.
बाईकच्या सर्व्हिसिंगचे फायदे अनेकांना माहिती आहेत, पण ती बराच काळ न केल्यासं अनेक नुकसान होऊ शकतात.
कमीत कमी तीन महिन्यातून एकदा बाईकची सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे.
काही जण ६ महिने, वर्षभर सर्व्हिसिंग करत नाहीत. त्यामुळं इंजिनमध्ये ऑईल संपून पिस्टन घासल्यानं डॅमेज होतं.
पिस्टन खराब झाल्यानंतर ते काम सुरु ठेवण्यासाठी जास्त ऑईल खातं, यामुळं महिन्याभरातच बाईकला पुन्हा ऑईल टाकवं लागतं.
सर्व्हिसिंग न केल्यानं ब्रेक फेल होतात, त्यामुळं अपघाताचा धोका संभवतो...
बाईकचे एअर फिल्टर न बदलल्यानं ते माती आणि धुळीमुळं जाम होतात आणि बाईक सारखी बंद पडते.
जास्त काळ चैनला ऑईलिंग न केल्यास ती जास्त घर्षणानं तुटण्याची शक्यता असते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.