ताप आला असताना आंघोळ करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

Aishwarya Musale

सर्दी

सर्दी-खोकल्याचा बदलत्या वातावरणामुळे त्रास होणं सामान्य आहे. बदलत्या हवामानात या सगळ्याशिवाय संसर्गजन्य तापाचा धोका खूप जास्त राहतो. 

ताप 

ताप टाळण्यासाठी काय करावं? ताप जर आलाच तर काय खावं? ताप आला तर आंघोळ करावी की नाही? असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात.

आंघोळ करावी की नाही

सर्वात मोठा प्रश्न म्हणजे संसर्गजन्य ताप असताना आंघोळ करावी की नाही? तर जेव्हा तुम्हाला व्हायरल फिव्हर येतो, त्यावेळी स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे.

व्हायरल फिव्हर

तुम्ही जितके स्वच्छ असाल तितक्या लवकर तुम्ही बरे व्हाल. जर तुम्हाला व्हायरल फिव्हर असेल तर तुम्ही कोमट पाण्याने आंघोळ केली पाहिजे. आंघोळ केल्यास तुम्हाला अधिक फ्रेश वाटेल.

औषधं

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, व्हायरल ताप आल्यास घरी बसून मेडिकलमधून औषधं आणून घेऊ नये. 

डॉक्टर

तर एकदा डॉक्टरांकडे देखील जाऊन यावे, डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा. स्वत:च मेडिकलमधून गोळ्या आणून बरं होण्याचा प्रयत्न केल्यास ताप बराच काळ राहू शकतो.

गरम पाणी

ताप लवकर जाण्यासाठी आणि स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही गरम पाणी, आल्याचा चहा, काढा पिऊ शकता आणि वाफ घेऊ शकता.

धोका

बदलत्या हवामानामुळे ताप येण्याचं धोका सर्वात जास्त असतो, अशा वेळी स्वत:ची काळजी घेणं आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.