साक्षी राऊत
एके काळी बॉलीवूड इंडस्ट्रीत अजय देवगण, काजोल आणि करिश्मा कपूर चांगलेच चर्चेत होते. त्यांच्या चित्रपटातील अभिनयाने अनेकांची मनं जिंकून घेतली आहे.
त्या काळी अजय देवगण आणि करिश्माच्या अफेअरची फार चर्चा होती.
असे म्हटले जाते की, अजय देवगणने करिश्माला सोडून काजोलशी लग्न केलं.
अशी चर्चा होती की, 'जिगर' चित्रपटादरम्यान अजय देवगण आणि करिश्मा एकमेकांच्या प्रेमात पडले.
त्यांच्या लव्ह अफेअरच्या चर्चांनंतर त्यांनी धनवान, सरगम आणि सुहाग यांसारखे चित्रपट एकत्र केलेत.
'हलचल' या चित्रपटानंतर अजय देवगण आणि करिश्मा कपूर यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला.
अजय देवगणचे नाव नंतर काजोलसोबत जोडले जाऊ लागले. या तिघांच्या लव्ह ट्रँगलची मीडियामध्ये त्यावेळी फार चर्चा होती.
यादरम्यान करिश्मा कपूरने स्टारडमला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये परसरणाऱ्या अफवांना फुल स्टॉप लावला. तिने सांगितले की आम्ही फक्त मित्र आहोत.
करिश्मा असंसुद्धा म्हणाली की, "अजय देवगण माझ्याबद्दल काय विचार करतो हे मला खरंच माहिती नाही. त्याने मला याबाबत कधी काही सांगितलेही नाही."
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.