रोहित कणसे
वाघ बकरी टी ग्रुपचे मालक पराग देसाई यांचे वयाच्या ४९ व्या वर्षी निधन झाले.
रविवारी पराग यांच्या घराबाहेर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर ब्रेन हॅमरेजमुळे रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
'वाघ-बकरी' हा आज देशातील मोठा ब्रँड बनला असून चहा कंपनीचे नाव 'वाघ-बकरी' का आहे? आणि त्याचे नाव कसे पडले असा प्रश्न अनेकांना पडतो, चला जाणून घेऊयात..
पराग यांच्या कंपनीच्या वाघ-बकरी नावात 'वाघ' हा उच्च वर्गाचे प्रतिनिधित्व करतो, तर 'बकरी' हा खालच्या वर्गाशी संबंधित आहे.
पराग देसाई यांच्या वाघ बकरी चहा समूहाचे संस्थापक हे नारणदास देसाई आहेत आणि ते कट्टर गांधीवादी होते.
1892 मध्ये नारणदास यांनी दक्षिण आफ्रिकेत 500 एकरच्या चहाच्या मळ्यातून हा व्यवसाय सुरू केला.
नारणदास यांना दक्षिण आफ्रिकेत वांशिक भेदभावाचा सामना करावा लागला होता कदाचित त्यामुळेच वाघ-बकरी हे नाव सद्भावनेचे प्रतिक म्हणून ठेवण्यात आले असावे,
दरम्यान या प्रसिद्ध कंपनीचे मालक पराग देसाई यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.