Sudesh
पृथ्वीवरील जवळपास सर्वच सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. त्यामुळेच ऑक्सिजनला मराठीत प्राणवायू असंही म्हटलं जातं.
आपल्या सूर्यमालेतील पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे, ज्यावर ऑक्सिजन उपलब्ध आहे. मात्र पृथ्वीवर कायम ऑक्सिजन असेल असं नाही.
पृथ्वीवर येत्या एक अब्ज वर्षांमध्ये वेगाने डीऑक्सिजनेशन प्रक्रिया घडणार आहे. यामुळे पृथ्वीच्या वायुमंडळातून ऑक्सिजन वायू नाहीसा होईल.
यावेळी पृथ्वीवरील ऑक्सिजनवर अवलंबून असलेल्या सर्व सजीवांचा अंत होईल. यात अर्थातच मानवाचा देखील समावेश असेल.
पृथ्वीच्या वातावरणात यावेळी मिथेन ग्रहाचं प्रमाण सर्वाधिक असेल. तसंच दुसऱ्या क्रमांकावर कार्बन डायऑक्साईड हा वायू असणार आहे.
एक अब्ज वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच पृथ्वीची ओझोन लेअर पूर्णपणे नष्ट होईल. यामुळे देखील मानवाला पृथ्वीवर राहणं अशक्य होईल.
हे होण्यासाठी आणखी बराच काळ असला, तरी त्यापूर्वी मानवाला दुसऱ्या ग्रहावर रहाण्याची सोय करणं भाग आहे.
पृथ्वीवरील ऑक्सिजन संपल्यानंतर आणखी एक अब्ज वर्षांनी पृ़थ्वीवरील महासागर देखील नष्ट होणार असल्याचं भाकित संशोधकांनी वर्तवलं आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.