सकाळ डिजिटल टीम
भात शिवाय जेवण म्हणजे अशक्य... आपल्या पैकी बऱ्याच लोकांना दिवसातून एकदा तरी भात खायला आवडतोच
भाताचे वेगवेगळे प्रकार वाचले तरी तोंडाला पाणी सुटते. खिचडी, जिरा राईस, फ्राईड राईस, पुलाव, बिर्याणी, अशा असंख्य प्रकारांची तांदळाची रेसिपी असते.
पण तुम्हाला हे माहित आहे का? कि या भाताचे प्रकार एका मराठी व्यक्तीनी शोधून काढले आहेत. त्यांच नाव दादाजी रामाजी खोब्रागडे
दादाजी रामाजी खोब्रागडे हे भाताच्या जास्त उत्पादन देणाऱ्या जाती शोधून काढणारे एक कृषी संशोधक होते.
केवळ इयत्ता तिसरी पर्यंत शिकलेले खोब्रागडे एक अल्पभूधारक शेतकरी होते. १९८३ पासून त्यांनी तांदळाचे नवीन वाण बनवण्याच्या प्रयोगाला सुरुवात केली. सहा वर्षांच्या बीजगुणनाच्या प्रयोगानंतर ते नवीन वाण तयार करण्यात यशस्वी झाले.
तांदळाच्या बाबतीतील संशोधनाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाकडून २००६ मध्ये वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार मिळाला होता.
खोब्रागडे यांनी भाताचे एकूण नऊ वाण शोधले
एच.एम.टी. सोना, नांदेड हिरा, नांदेड चेन्नूर, विजय नांदेड, नांदेड ९२, डीआरके, नांदेड दीपक, काटे एच.एम.टी., डीआरके-२
खोब्रागडे यांनी केलेल्या संशोधनाच्या जोरावर अनेक बियाणे कंपन्यांनी पैसे मिळवले. ते मात्र हलाखीचे जीवन जगत राहिले.
२०१० मध्ये फोर्ब्सच्या यादीत नाव, आणि असंख्य पुरस्कार प्राप्त
अशा या मराठी माणसाला मानाचा मुजरा.