सकाळ डिजिटल टीम
लग्न करु नका असा सल्ला आपल्याला अनेकदा विवाहित लोक देत असतात.
पण एका अभ्यासातून हे समोर आलंय की, दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी लग्न करणं फायद्याचं असतं.
ग्लोबल एपिडेमियॉलॉजी हा संशोधन अहवालात प्रसिद्ध झाला आहे.
या अहवालानुसार, विवाहित महिलांमध्ये मृत्यूचं प्रमाणं अविवाहित महिलांच्या तुलनेत ३५ टक्क्यांनी कमी आहे.
तसेच विवाहित पुरुष हे अविवाहित पुरुषांच्या तुलनेत जास्त काळ निरोगी आयुष्य जगतात.
विवाहित लोकांमध्ये अविवाहितांच्या तुलनेत हृदयविकार, नैराश्य, एकटेपणा, स्मृतीभंश, ब्लड शुगर, त्वचेचा कर्करोग या आजारांचं प्रमाणं कमी असतं.
याचं कारण म्हणजे विवाहित लोक आपली जीवनशैली चांगली ठेवतात, जी अविवाहित लोकांमध्ये बिघडलेली असते.
लग्न करणं हे वैयक्तिक स्वरुपापेक्षा सामाजिक स्वरुपातही परिणामकारक असतं.
त्यानुसार, कामधंदा करण्यास प्रोत्साहन, मानसिक-शाररिकदृट्या तंदुरुस्ती, नात्यांतील आव्हानं-आनंद जगण्याची उर्मी वाढवतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.