धनश्री भावसार-बगाडे
काही लोकांना नियमित वजन चेक करण्याची सवय असते.
विशेष करून जेव्हा तुम्ही वजन कमी करत असतात तेव्हा पुन्हा पुन्हा चेक करतात.
खरं तर असं करण्याची गरज नाही आहे. फक्त सकाळीच वजन चेक करा.
वजन करण्यापूर्वी टॉयलेटला जाऊन यावे. नेहमी रिकाम्यापोटीच वजन चेक करावे.
पोट साफ झाल्यावर आधी वजन करा आणि मग त्यानंतर चहा नाश्ता घ्या.
सकाळच्या ऐवजी संध्याकाळी वजन चेक करत असाल तर दोन्ही वजनांमध्ये साधारण अर्धा ते एक किलोचा फरक पडतो.
दिवसभरात नाश्ता, दुपारचे जेवण, चहा झालेले असते जे नीटसं पचलेलं असेलच असं नाही.
तज्ज्ञांचं मत आहे की, फक्त त्याच लोकांचं वजन सकाळ, संध्याकाळ समान असतं जे दिवसभर फार अॅक्टिव्ह असतात.
पण बहुतांश वेळा सकाळीच केलेलं वजन हे तुमचं खरं वजन असतं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.