Navratri : घटस्थापनेला गहू पेरण्याचं काय आहे महत्व?

सकाळ डिजिटल टीम

देवीवर श्रध्दा असणारे लोक नवरात्री फार उत्साहात साजरी करतात. याकाळात आदिशक्तीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते.

नवरात्रीला कलशाची स्थापना करून त्याच्या शेजारी गहू पेरले जातात. असे मानले जाते की, गहू पेरल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही.

आज आम्ही तुम्हला नवरात्रीच्या मुहूर्तावर गहू पेरण्याचे धार्मिक कारण सांगत आहोत.

गव्हाला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे प्रकृतीचे प्रतिक आणि देवीचे स्वरुप असणारे हे धान्य आहे.

नवरात्रीत गहू पेरणीपासून ते उगवण्यापर्यंत त्याला फार महत्व आहे. या ९ दिवसात हे रोप वेगात वाढणे फार महत्वाचे समजले जाते.

असे मानले जाते की, गहू पेरल्यानंतर लगेचच त्याला अंकूर फुटून हिरवीगार पाती आली तर हा शुभ संकेत समजला जातो.

जेंव्हा रोप वेगात वाढायला लागते तेव्हा तुमच्या कामात येणाऱ्या अडचणी लवकरच दूर होणार असे म्हटले जाते.

जर पेरलेले गहू नीट उगले नाहीत तर याला अशुभ संकेत समजला जातो.

जर कलशा शेजारी पेरलेल्या गव्हाची रोप पिवळी पडून झडू लागली तर भविष्यात अडचणी येणार असल्याचे संकेत समजले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.