उन्हाळ्यात कांदा खाण्याचे फायदे माहितेयत?

रोहित कणसे

उन्हाळ्यात कांदा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो, रोज एक किंवा दोन कांदे खाल्ल्यास आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात असे तज्ज्ञ सांगतात.

कांद्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी आढळतात, त्यासोबतच यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-एलर्जिक आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात.

आज आपण नियमीत कांदा खाणेच्या फायदे काय आहेत, याबद्दल जाणून घेणार आहोत.

उन्हाळ्यात अनेकदा उष्माघाताने लोक आजारी पडतात, अशा परिस्थितीत जर तुम्ही नियमीत कांदा खाल्ल्यास उष्माघातासारख्या समस्या टाळता येतील आणि यापासून तुमचा बचाव होऊ शकेल.

उन्हाळ्यात जेव्हा कडक उन वाढल्यानंतर कच्च्या कांद्याचा आहारात समावेश करावा, कांदा अशा हवामानात शरीराला थंड ठेवण्याचे काम करतो.

कांद्यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म खूप फायदेशीर असून यामध्ये सेलेनियम नावाचे तत्व आढळते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे आणि शरीराला आजारांपासून दूर ठेवण्याचे काम करते.

उन्हाळ्यात कांदा अतिशय गुणकारी असल्याचे आरोग्य तज्ज्ञ मानतात, नियमीत कांदा खाल्ल्याने अपचन होत नाही.

कच्चा कांदा आणि लिंबाचा रस घालून कोशिंबीर खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते आणि पोटाचे आजार देखील होत नाहीत.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांसाठी कच्चा कांदा फायदेशीर ठरू शकतो. कांदा खाल्ल्याने साखरेची पातळी राखण्यास मदत होऊ शकते.

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारीत असून योग्य सल्ल्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्या.

उन्हाळ्यात केस खराब होतात? मग, फॉलो करा सोप्या टिप्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.