युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम
टीव्ही मनोरंजन विश्वातील सर्वाधिक चर्चेतील मालिकांमध्ये रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेचा उल्लेख करावा लागेल.
भारतातील आजवरची सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणून रामायणची ओळख सांगितली जाते.
त्यावेळी रामायण मालिकेत काम केलेल्या कलाकारांना २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे.
रामानंद सागर यांची निर्मिती असलेल्या रामायण या मालिकेचे प्रक्षेपण १९८७ ते १९८८ दरम्यान झाले होते. त्यावेळी जगभरातील ५५ देशांमध्ये त्याचे टेलिकास्ट झाले होते.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यावेळी जगभरातून तब्बल ६५ कोटी प्रेक्षकांनी हा मालिका पाहिली होती. त्याचं कौतुक केलं होतं.
रामायण ही मालिका प्रदर्शित झाली तेव्हा या मालिकेच्या प्रत्येक एपिसोडनं तब्बल ४० लाख रुपयांची कमाई केली होती. तर प्रत्येक बजेट होतं ९ लाख रुपयांचे.
त्या काळात रामायण मालिकेत जे अॅनिमेशन आणि व्हिएफएक्स करण्यात आले त्यामुळे या मालिकेचे निर्मितीमुल्य जबरदस्त असल्याचे सांगण्यात आले होते.
रामानंद सागर यांनी वाल्मिकी रामायण आणि तुलसीदास यांच्या रामचरित मानस यांच्या आधारे रामायण मालिकेची स्क्रिप्ट लिहिली होती.
रामायण मालिका तयार करण्यापूर्वी त्यांनी अनेक महिने त्या कथेचा अभ्यास करुन त्यातील अनेक पात्रांना समजून घेतले होते.
आजही सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय असणाऱ्या मालिकांमध्ये रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेचा उल्लेख होतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.