Anuradha Vipat
एक काळ असा होता जेव्हा गायक अभिजीत भट्टाचार्यला शाहरुख खानचा आवाज म्हटले जायचे.
नव्वदच्या दशकात अभिजीतने जवळपास प्रत्येक चित्रपटात शाहरुखचा आवाज म्हणून गाणी गायली. तेव्हा शाहरुखला अभिजीत भट्टाचार्यशिवाय अपूर्ण मानले जात होते.
पण त्यानंतर असे काही घडले ज्यामुळे शाहरुख आणि अभिजीतमध्ये तेढ निर्माण झाली. हे अंतर इतके खोल गेले की अभिजीत भट्टाचार्य यांनी शाहरुखसाठी पुन्हा एकही गाणे गायले नाही.
शाहरुखसाठी कधीही गाणी गाणार नाही, अशी शपथ त्याने घेतली. आणि आता अचानक अभिजीत भट्टाचार्यने शाहरुख खानचे कौतुक करायला सुरुवात केली आहे.
त्यांनी आता या अभिनेत्याचे सर्वात महान देशभक्त आणि राष्ट्रवादी असे वर्णन केले आहे. अखेर असे काय घडले की अभिजीत भट्टाचार्यमध्ये असा बदल दिसला?
अभिजीत भट्टाचार्य यांनी मुलाखतीत सांगितले की, शाहरुख स्वतःच्या बळावर आहे. त्याने स्वत:ला स्वत:ला सक्षम बनवले आहे. अभिजीतने सांगितले की, शाहरुखमध्ये तोच गुण त्याला स्वतःमध्ये दिसतो.
अभिजीत भट्टाचार्य यांनी सांगितले की, शाहरुखसोबतचे वैयक्तिक मतभेद दूर करण्याचा त्यांनी अनेकदा प्रयत्न केला, पण सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.