Sandip Kapde
शिवाजी महाराजांशी थेट संपर्क आलेल्या आणि त्यांना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेल्या दोन भाग्यशाली विदर्भातील महिलांपैकी एक सावित्रीबाई होत्या.
त्या माहुरच्या राजे उदाराम यांच्या पत्नी होत्या आणि त्यांना रायबाघन म्हणूनही ओळखले जात होते.
औरंगजेबाने त्यांना 'रायबाघन' हा किताब बहाल केला होता. त्या केवळ लढवय्याच नव्हत्या, तर कुशल मुत्सद्दीही होत्या.
जानेवारी १६६१ मध्ये शाहिस्तेखानाने कारतलबखानाच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांविरुद्ध कोकण मोहीम काढली होती, ज्यामध्ये रायबाघन सहभागी झाली होती.
इतिहासात प्रसिद्ध असलेल्या उंबरखिंडीच्या लढाईत रायबाघनने घोड्यावर स्वार होऊन, चिलखत आणि धनुष्यबाण धारण केलेले शिवाजी महाराज कारतलबखानाशी झुंजताना पाहिले.
महाराजांनी कारतलबखानाला उंबरखिंडीत पूर्णपणे कोंडले होते.
त्यामुळे कारतलबखानासह त्याच्या सर्व सरदारांवर कैदेत पडण्याची वेळ आली.
त्या संकटसमयी रायबाघनने पुढाकार घेत कारतलबखानास शिवाजी महाराजांसमोर शरणागती पत्करण्यास प्रवृत्त केले.
तिच्या सल्ल्यानुसार कारतलबखानाने शरणागती पत्करली आणि सर्वांना सुटका मिळाली.
महाराजांनी रायबाघनच्या शौर्याची प्रशंसा करून तिचे कौतुक केले.
सन्मानस्वरूप तिला साडीचोळी देऊन विदर्भात परत पाठवले.
राजे उदाराम यांची वंशावळ आजही वाशिम परिसरात अस्तित्वात आहे.
वरील माहिती विजयराव देशमुख यांच्या २०१६ मध्ये सकाळ वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखावर आधारित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.