Amit Ujagare (अमित उजागरे)
शहाळं या फळ थंड प्रकृतीचं असलं तरी, त्यामुळं हिवाळ्यात ते प्यावं की नाही अशी अनेकांना शंका असते.
आपण जाणून घेऊयात नारळ पाणी थंडीच्या दिवसात पिणं योग्य की अयोग्य?
तज्ज्ञांच्या मते नारळ पाण्याची प्रकृती भलेही थंड असोत पण थंडीच्या दिवसात याचं सेवन करणं प्रकृतीसाठी खूपच चांगलं असतं.
शहाळ्यात भरपूर प्रमाणात मिनरल्स असतात. पचनासाठी हे खूपच फायदेशीर असतात. त्यामळं पोट बिघडल्यास नारळ पाणी प्यायलं जातं.
नारळ पाणी प्यायल्यानं तुम्ही कायम एनर्जेटिक राहता.
नारळ पाण्यात कॅलरीज कमी असतात. त्यामुळं हे प्यायल्यानं रक्तशर्करा वाढत नाही. उच्चरक्तदाब असलेल्यांसाठी हे खूपच लाभदायक आहे.
गर्भवतींसाठी नारळ पाणी पिणं खूपच फायदेशीर असतं. कारण त्यामुळं गर्भवती स्त्रीला कधीही थकवा जाणवत नाही.
नियमित नारळ पाणी प्यायल्यास शरिरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रित राहतं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.