या पाच खेळाडूंचा टी 20 वर्ल्डकप संघातून होणार पत्ता कट?

अनिरुद्ध संकपाळ

ऋतुराज गायकवाड

भारतीय टी 20 संघातील कोणत्या जागेसाठी सर्वात मारामारी असेल तर ती सलामीसाठी आहे. सध्या तरी रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल हे उजवे - डावे कॉम्बिनेशन आघाडीवर आहे. त्यामुळे दुखापतग्रस्त ऋतुराज गायकवाडचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

तिलक वर्मा

मधल्या फळीत विराट कोहली परतल्याने तिलक वर्माचे संघातील स्थान डळमळीत झालं आहे. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या संघात परतला तर तिलकचे टी 20 वर्ल्डकप खेळण्याचे स्वप्न स्वप्नच राहू शकते.

शुभमन गिल

शुभमन गिल जरी वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या गळातील ताईद झाला असला तरी टी 20 क्रिकेटचा विचार केला तर मागून आलेल्या यशस्वी जयस्वालने बाजी मारल्याचं दिसून येतं. वर्ल्डकपमध्ये सलामीवीर म्हणून रोहितसोबत यशस्वीने दावेदारी ठोकली आहे.

केएल राहुल

केएल राहुल वनडे आणि कसोटीत मधल्या फळीत जरी दमदार कामगिरी करत असला तरी टी 20 मध्ये मात्र मॅच फिनिशर म्हणून त्याची जागा फिट होत नाहीये. विकेटकिपर म्हणून देखील भारतीय संघाकडे अनेक नवे चेहरे आहेत. तसेच शिवम दुबे, रिंकू सिंह या युवा खेळाडूंनी देखील राहुलला चांगलंच आव्हान दिलं आहे.

इशान किशन

इशान किशनला क्रिकेटमधून ब्रेक घेणं चांगलंच महागात पडू शकते. कारण त्याच्या अनुपस्थितीत जितेश शर्माने आपली चुणूक दाखवली आहे. तसेच संजू सॅमसन देखील टी 20 संघात परतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.