Aishwarya Musale
प्रत्येक ऋतूत त्वचेची काळजी घेणं गरजेचं असतं. अशावेळी त्वचेला नीट मॉइश्चरायझ करणं गरजेचं आहे. पण अनेकांची त्वचा कोरडी पडण्याचे कारण म्हणजे प्रदूषण आणि सूर्यप्रकाश.
त्याचबरोबर चुकीच्या सवयींमुळे अनेकदा त्वचेशी संबंधित समस्या उद्भवतात. अशावेळी मॉइश्चरायझरचा वापर केला तरी त्याचा काही विशेष परिणाम होणार नाही.
गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीराचा सर्व थकवा दूर होतो. पण गरम पाण्याच्या वापरामुळे तुमची त्वचा खराब होते.
पाण्यामुळे तुमच्या त्वचेतील तेल आणि ओलावा दूर होतो आणि त्वचा कोरडी होते.
त्यामुळे गरम पाण्याने आंघोळ करण्याऐवजी कोमट पाण्याने आंघोळ करावी किंवा आंघोळीत थंड पाण्याचा वापर करावा.
तुमच्या चेहऱ्याची त्वचा अतिशय नाजूक असते. टॉवेलचा योग्य वापर केला नाही तर चेहऱ्याची त्वचा लाल होईल इतकंच नाही तर टॉवेल चेहऱ्यावर चोळल्यास तुमची त्वचा कोरडी होते.
जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण जर तुम्ही मर्यादेपेक्षा जास्त पाणी प्यायले तर ते देखील तुमचे नुकसान करू शकते.
जास्त पाणी प्यायल्याने तुमची त्वचा कोरडी आणि निर्जीव होऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.