Pranali Kodre
भारत - पाकिस्तान देशात तणाव वाढत चालला आहे. अशात ८ मे रोजी पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील धरमशाला येथे होणारा सामना १०.१ षटकानंतर रद्द करण्यात आला.
त्यानंतर आयपीएल २०२५ स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. यामुळे खेळाडूही आपापल्या घरी परतले आहेत.
आयपीएल २०२५ स्पर्धेतील अद्याप १६ सामने बाकी आहेत. यात प्लेऑफ आणि अंतिम सामन्याचाही समावेश आहे.
आता आयपीएलमधील हे उर्वरित १६ सामने कधी आणि कुठे खेळवायचे याचा निर्णय होणे बाकी आहे. दरम्यान, आयपीएल स्थगित झाल्याने त्याचे आर्थिक नुकसानही मोठे आहे.
सध्या जे रिपोर्ट्स समोर आले आहेत, त्यानुसार प्रसारण हक्क, प्रायोजकत्व करार, तिकीट विक्री आणि सामन्याच्या कामकाजातून मिळणारे उत्पन्न, हे सर्वत गमावल्याने प्रत्येक स्थगित आयपीएल सामन्यामागे बोर्डाला सुमारे १०० ते १२५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
जरी विमा मिळाला, तरी प्रत्येक सामन्यामागे ६० कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.
बीसीसीआय आणि फ्रँचायझींव्यतिरिक्त आयपीएल स्थगित होण्याचे परिणाम माल विक्रेते, कॅब ड्रायव्हर आणि सामन्यावर अवलंबून असणाऱ्या स्थानिक आणि तात्काळ व्यवसायांवरही झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.