धनश्री भावसार-बगाडे
उपवास म्हटलं की, पटकन आठवणारे पर्याय म्हणजे साबुदाणा अन् बटाटे, शेंगादाणे. पण सारखा साबुदाणा, शेंगदाणे, बटाटे खाल्ल्याने पोट खराब होते.
श्रावणात अनेकांचे उपवास असतात. त्यात आज श्रावण सोमवार असल्याने बहुतेकांचा उपवास असतोच.
अशावेळी रताळी खाणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत.
रताळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. उकडलेल्या रताळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे मधुमेहींनी रताळे उकडून खावे.
रताळ्यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे हृदयविकार आणि कर्करोग . यांचा धोका कमी करण्यासाठी रताळे खाणे उपयुक्त ठरते.
अनेक महिलांना पीसीओडीचा त्रास असतो. अशा महिलांनी नियमितपणे रताळे खायला हवे.
रताळ्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ज्यांना अपचन, अॅसिडिटी, काँस्टिपेशन असा त्रास होतो त्यांनी रताळे खावे.
वजन कमी करण्यासाठी जे प्रयत्न करतात त्यांनी तर रताळी खायलाच हवेत. कारण रताळ्यात फायबरचे प्रमाण चांगले असते, जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
रताळ्यामध्ये व्हिटॅमीन ए चे प्रमाण चांगले असते. त्यामुळे डोळे, त्वचा चांगली राहण्यास मदत होते. शिवाय यात व्हिटॅमीन बी आणि इतर खनिजेपण असतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.