'या' ५ चुका कराल तर तारुण्य हातचं घालवाल!

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये या पाच चुकांपैकी काही चुका हमखास करतो.

तुम्हीही तुमच्या आयुष्यात या चुका केल्या असतील किंवा भविष्यात तुमच्या हातून या चुका घडू शकतात.

या चुकांमुळे तुमचं संपूर्ण तारुण्य वाया जाण्याची भीती आहे. कोणत्या आहेत या चुका?

योग्य वेळी लग्न न करणे ही एक मोठी चूक ठरू शकते. तुमच्या तारुण्यामध्ये तुम्हाला या गोष्टीचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

अनेक तरुण एखाद्या मुलीच्या, मुलाच्या प्रेमात पडून, त्यात धोका मिळाल्याने व्यसनी बनतात. त्यामुळे आपला अभ्यास, करियरकडे दुर्लक्ष करू लागतात.

प्रेम करू नका असं म्हणणं नाही, पण प्रेमाला आपलं करियर आणि परिवारापेक्षा जास्त महत्त्व देऊ नका नाहीतर पश्चातापाची वेळ येईल.

आपल्या आवडीचा करियर ऑप्शन न निवडता आईवडिलांच्या किंवा इतरांच्या प्रभावाखाली येऊन करियरची निवड करणं.

जर तुम्हाला तुमचं काम आवडत नसेल तर तुमचं त्या कामात लक्ष लागणार नाही आणि तुम्ही नाराज राहाल, तुमचं तारुण्य या नाराजीतच जाईल.

स्वतःला कमी लेखणे आणि दुसऱ्यासोबत आपली तुलना करणे धोकादायक आहे. तुम्ही कोणाकडेही लक्ष न देता स्वतःच्या प्रगतीवर काम करत राहा. नाहीतर तुम्ही कधीच समाधानी राहू शकणार नाही.

तारुण्यात येताच अनेक तरुण सेक्स हेच आपल्या आयुष्याचं उद्देश आहे, असं मानतात आणि त्यात वाहत जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.