Yashwant Kshirsagar
आचार्य चाणक्य यांनी पती-पत्नीने काही गोष्टी एकत्र न करता वैवाहिक आयुष्यातील अडी-अडचणींवर कशी मात करता येईल याबद्दल सांगितले आहे.
नवरा-बायको यांच्यात कितीही प्रेम असले तरी त्यांचा संसार सुरळीत व्हावा यासाठी काही गोष्टींचे पालन करायलाच हवे, असे चाणक्य म्हणतात.
आचार्य चाणक्य यांच्या माहितीनुसार, पती-पत्नीने त्यांच्या खासगी गोष्टी एकमेकांना सांगू नयेत. काही गोष्टी स्वतःपुरताच मर्यादित ठेवाव्यात. नाहीतर वैवाहिक आयुष्य धोक्यात येऊ शकते.
पती-पत्नीने त्यांच्या नात्याची मर्यादा कधीच ओलांडू नये. नाहीतर नात्याला तडा जाऊ शकतो.
पती-पत्नीने कोणतंही महत्त्वाचं काम किंवा करिअर संबंधी गोष्टी करु नयेत. त्यामुळं कामाचा तणाव आपसूकच एकमेकांवर निघतो आणि त्यामुळं वाद होण्याची शक्यता असते.
नवरा-बायकोने एकत्र ध्यानधारणा करु नये यामुळं लक्ष विचलित होऊ शकते. व तुम्ही ध्येयापासून भरकटू शकता
कधीच बाहेरील कोणत्याही परक्या व्यक्तीसमोर आपल्या नव-याचा किंवा बायकोचा अनादर करू नका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.