सकाळ डिजिटल टीम
गरोदरपणात हिरव्या पालेभाज्यांचं अधिक सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
परंतु गरोदर महिलांनी कोबीचं अतिसेवन करू नये. कारण कोबीमध्ये कीटकनाशके आणि बुरशी असू शकते. अशा भाज्या खाल्ल्यानं आपल्याला एलर्जी होऊ शकते किंवा इतर समस्या उद्भवू शकतात.
गर्भावस्थेत वांगी जितकी कमी खाल तितकं आरोग्यासाठी चांगलं आहे. ज्या मातीत वांगीची लागवड केली जाते, त्यात टॉक्सोप्लाझ्मोसिस (Toxoplasmosis) नावाचा घटक आढळतो. त्यामुळे गर्भपाताचा धोका वाढतो.
जास्त प्रमाणात वांगी खाल्ल्यास एलर्जीची समस्या उद्भवू शकते. इतकंच नाही तर गरोदरपणात पचनक्रिया मंदावलेली असते. वांगी खाल्यानं बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गर्भावस्थेत उष्ण पदार्थांचं सेवन टाळावं, असं आपल्याला डॉक्टर सल्ला देतात.
आलं (Ginger) देखील उष्ण पदार्थ आहे. गरोदरपणात महिलांनी आल्याची पदार्थ खाणं टाळायला हवं. गर्भधारणेच्या सुरूवातीच्या तीन महिन्यांत गर्भपात होण्याची समस्या उद्भवू शकतात.
गरोदरपणात कारले (bitter gourd) अतिप्रमाणात सेवन करू नये. त्यामुळे पोटदुखी, अपचन आणि अतिसारसारख्या समस्या उद्भवू शकतात.
गरोदरपणात गाजर जास्त प्रमाणात खाल्ल्यानं त्वचा पिवळसर होऊ शकते. गाजरमध्ये कॅरोटीन नावाचा घटक असतो.
गाजर जास्त सेवन केल्यास आपल्याला कॅरोटिनीमिया होण्याची शक्यता असते. इतकंच नाही तर गाजरमध्ये असलेले व्हिटॅमिन एचे प्रमाण गर्भवाढीस अडथळा आणू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.