धनश्री ओतारी
शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या आषाढी वारीला आता सुरुवात झाली आहे.
वारीत डोक्यावर तुळस घेतलेल्या बायका नजरेस पाहायला मिळतात.
वारकरी संप्रदायात तुळशीला अत्यंत महत्त्व आहे.
आषाढीची असो वा कातिर्की वारीत तुळशी वृंदावनला डोक्यावर घेऊन भक्तगण भक्तीत तल्लीन झालेली असतात.
मग डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पायी वारी का करतात?
तुळस भगवंतापेक्षाही मोठी आहे असं मानलं जातं.
तुळस ही कृष्णसखी असल्याने पांडुरंगाचीही ती सखीच.
श्रीविष्णूच्या प्रत्येक पूजेत तुळस वाहावी लागते.
पंढरीचा विठुराय म्हणजे श्रीविष्णूंचं एक रूप मानलं गेलं आहे.
तुळशीत देवी लक्ष्मी वास करते त्यामुळे तुळस डोक्यावर घेऊन जाण्याची भावना या महिलांमध्ये पाहायला मिळते.
वैज्ञानिक कारणानुसार, डोक्यावरच्या तुळशीने आसपासच्या २० ते २५ फुटांपर्यंतच्या हवेत ऑक्सिजनची योग्य मात्रा राखण्यास तुळस मदत करते असं सांगितलं जातं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.