kimaya narayan
अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी. बॉलिवूडचे महानायक अशीही त्यांची ओळख आहे.
अमिताभ यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यांचे जंजीर, नमकहलाल, नौटंकीवाला, हेराफेरी, अमर अकबर अँथनी हे सिनेमे खूप गाजले. प्रकाश मेहरा आणि मनमोहन देसाई या दोन्ही दिग्गज दिग्दर्शकांबरोबर अमिताभ यांनी अनेक सिनेमे केले.
पण तुम्हाला माहित आहे का ? अमिताभच या दोन्ही दिग्दर्शकांमधील एका भांडणाचं कारण ठरले. नेमकं काय घडलं ते उघड झालं नाही पण प्रकाश मेहरा यांना हेराफेरी प्रमाणेच अमिताभ यांनी अमर अकबर अँथनी मध्ये केलेला बेवड्या माणसाचा सीन आवडला नाही.
प्रकाश मेहरा यांनी असं म्हटलं कि, मनमोहन यांनी अमिताभ यांचे कान भरले आणि त्यामुळेच त्यांनी हेराफेरी मधील बेवड्याचा सीन अमर अकबर अँथनीमध्ये फेरफार करून वापरला.
तर मनमोहन देसाई यांनी टीका केली कि मर्दचं मर्द सारखा सिनेमा बनवू शकतो आणि शराबी माणूस शराबी सारखा सिनेमा बनवतो. तर प्रकाश यांनी म्हटलं कि कुलीजचे चारित्र्यही मनजींपेक्षा स्वच्छ असते.
एकूणच एका सीनवरून म्हणा किंवा आणखी काही या दोन्ही दिग्दर्शकांमध्ये जोरदार वाद झाला. पण याच खरं कारण आजतागायत कळलं नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.