नवरात्रीत रोज खा ही फळे, दिवसभर राहाल अ‍ॅक्टीव्ह

Aishwarya Musale

नवरात्री

नवरात्रीच्या निमित्त अनेक लोक 9 दिवस उपवास करतात. ९ दिवसांच्या दीर्घ उपवासात अनेकांना अशक्तपणा जाणवू लागतो.

अशक्तपणा

जर तुम्हाला उपवासाच्या वेळी अशक्तपणा जाणवत असेल तर दिवसभरात दर 2 तासांनी 1 ते 2 फळे खा. यामुळे तुमची शारीरिक थकवा दूर राहण्यास मदत होईल.

शरीर

यासोबतच शरीराला पुरेसे पाणीही मिळेल. आज आम्ही तुम्हाला काही अशाच फळांबद्दल सांगणार आहोत.

थकवा

जेणेकरुन उपवासात खाल्ल्याने तुम्हाला शारीरिक थकवा जाणवणार नाही.

सफरचंद

नवरात्रीनिमित्त सफरचंद खा. सफरचंद खाल्ल्याने तुमच्या शरीराला अधिक प्रमाणात फायबर मिळेल. जर तुम्ही 9 दिवस उपवास करत असाल तर नवरात्रीत सफरचंदाचे सेवन जरूर करा.

ब्लूबेरी

जर तुम्हाला उपवासात उत्साही राहायचे असेल तर तुमच्या आहारात ब्लूबेरीचा समावेश करा. यात पाण्याचेही प्रमाण अधिक असते. यामुळे तुम्हाला खूप बरे वाटेल.

संत्री

संत्री खाल्ल्याने तुमचे शरीर आरोग्यादायी आणि तंदुरुस्त राहते. याशिवाय संत्र्यामध्ये पाणी आणि फायबरही असते, जे तुम्हाला दिवसभर हायड्रेट ठेवण्यासाठी प्रभावी ठरते.

मनुका

मनुका खाल्ल्याने तुमचे शरीर हायड्रेटेड राहते. यासोबतच तुमच्या शरीराला भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स मिळतात, ज्यामुळे तुम्हाला शारीरिक कमजोरी जाणवत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.