पहिल्या वर्षाला घाबरुनच लोक म्हणतात, 'लग्न नको गं बाई!'

सकाळ डिजिटल टीम

लग्नानंतरचं पहिलं वर्ष नवरा आणि नवरी दोघांसाठीही खूप अवघड जातं. कशामुळे? जाणून घ्या..

नव्या जबाबदाऱ्या - घरची, जोडीदाराची आणि घरातल्या इतरांची जबाबदारी आल्याने रुळायला थोडा वेळ लागतो.

नवं घर - वर्षानुवर्षे ज्या घरात राहिलो, ते सोडून नव्या ठिकाणी राहायला जाणं मुलींना अवघड जातं. तर नवी व्यक्ती आपल्यासोबत आपल्या घरात राहणार यामुळे मुलांनाही जरा अवघडल्यासारखं वाटतं.

नवे लोक आणि त्यांच्या सवयी - घरातल्या नव्या लोकांच्या सवयी, स्वभाव जाणून घेण्यात वेळ जातो.

अपेक्षांचं ओझं - दोन्ही कुटुंबाच्या नवरा नवरीकडून जबाबदाऱ्या स्विकारण्याची, मनं सांभाळण्याची अपेक्षा असते. याचं कधी कधी ओझं होतं.

एकमेकांना वेळ देणं जमत नाही - लग्नानंतर जबाबदाऱ्या आणि अपेक्षांच्या ओझ्यामुळे दोघांना एकमेकांना वेळ देणं जमत नाही, त्यामुळे चिडचिड होते.

एकमेकांचे निगेटिव्ह मुद्दे - एकमेकांसोबत काही काळ घालवल्यानंतर फक्त स्वभावातले चांगले गुणच नव्हे तर वाईट गुणही दिसू लागतात. त्यामुळे थोडी नाराजी होती.

एकमेकांशी न पटणं - नव्या स्वभावांसोबत जुळवून घेताना थोडे खटके उडतात.

एकटेपणा - सुरुवातीला दोघंही अवघडलेले असतात. एकमेकांसोबत हवं तेवढं रोमँटिक होणं अवघड असतं. त्यातूनच एकटेपणा येऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.