
थोडक्यात -
१५ ऑगस्ट रोजी आपला देश स्वातंत्र्याचा ७९वा वर्धापन दिन साजरा करत आहे.
या ऐतिहासिक क्षणाचा खरा आनंद साजरा करायचा असेल तर काही पुस्तक तूम्ही नक्की वाचायला हवीत.
१५ ऑगस्ट दिवशी स्टेटस टाकून देशप्रेम दाखवू नका. तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामात विरांनी दिलेले योगदान आठवा आणि ते वाचा.
तूम्ही स्वातंत्र्य दिनाची आठवण, देशप्रेम म्हणून ही पुस्तकं भेटही देऊ शकता. Amazon वर तूम्हाला अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत.
आपला देश पारतंत्र्यात होता तो १९४७ रोजी स्वतंत्र्य झाला, हे तर सर्वांनाच माहितीये. मात्र, देशाचा स्वातंत्र्य संग्राम या एका वाक्यात कधीच पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी तो समजून, उमगून घेतला पाहिजे. १५ ऑगस्ट रोजी आपला देश स्वातंत्र्याचा ७९वा वर्धापन दिन साजरा करत आहे.
या ऐतिहासिक क्षणाचा खरा आनंद साजरा करायचा असेल तर काही पुस्तक तूम्ही नक्की वाचायला हवीत. केवळ १५ ऑगस्ट दिवशी स्टेटस टाकून देशप्रेम दाखवू नका. तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामात विरांनी दिलेले योगदान आठवा आणि ते वाचा.
तूम्ही भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास सांगणाऱ्या सर्वोत्तम पुस्तकांची निवड करू शकतो किंवा अगदी प्राचीन काळातील इतिहासाची रक्तरंजीत सफरही करू शकता. पुस्तक वाचन हा एखाद्याचा छंद असतो तर काहींचे जीवन बदलणारा क्षण असतो. यंदा स्वातंत्र्य दिनाच्या सुटीनंतर लगेचच शनिवार-रविवारचा विकेंड असल्यामुळे इतर जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी भरपूर वेळ मिळेल.
तूम्ही स्वातंत्र्य दिनाची आठवण, देशप्रेम म्हणून ही पुस्तकं भेटही देऊ शकता. Amazon वर तूम्हाला अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. यातील काही मोजकी पुस्तकांची यादी इथे आम्ही तूम्हाला देत आहोत. त्यातील पुस्तके ऑफर रेटमध्ये खरेदी करा.
"इंडिया आफ्टर गांधी" हे रामचंद्र गुहा यांनी लिहिलेले एक महत्वाचे पुस्तक आहे, ज्याचा मराठी अनुवाद "गांधींनंतरचा भारत" असा आहे. हे पुस्तक भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या (१९४७ पासून) इतिहासावर आधारित आहे आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचा इतिहास यात मांडला आहे.
हे पुस्तक भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या राजकीय, सामाजिक, आणि सांस्कृतिक बदलांचे विस्तृत वर्णन करते. यात भारताच्या विकासातील आव्हाने, यशोगाथा, आणि विविध टप्पे यांचा समावेश आहे. या पुस्तकाची मूळ किंमत 2000 च्या घरात आहे, पण हे पूस्तक तूम्हाला फक्त 741 इतक्या किंमतीत मिळेल.
हे पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Gandhi: The Years That Changed the World, 1914-1948" या रामचंद्र गुहा लिखित पुस्तक आहे. हे पुस्तक म्हणजे, एक अत्यंत प्रशंसित चरित्रात्मक कृति आहे. या पुस्तकामध्ये 1914 ते 1948 या काळात गांधीजींच्या जीवनावर आधारित आहे. हा चरित्र मालिकेतील दुसरा खंड आहे, ज्यापूर्वी "Gandhi Before India" हा पहिला खंड येतो. या पुस्तकात भारतीय स्वातंत्र्य चळवळीत गांधीजींच्या नेतृत्वासह त्यांच्या आयुष्यातील अत्यंत निर्णायक काळातील घटनांचा आढावा घेतला आहे.
या पुस्तकाची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Western Media Narratives on India हे पुस्तक भारतावर लक्ष केंद्रित करते. हे 1947 पासून भारताच्या स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंतचा माध्यमातील प्रवास मांडते आणि पाश्चात्य इंग्रजी माध्यमांनी भारतीय नेतृत्वावर सातत्याने केलेल्या टीकेचे बारकाईने विश्लेषण करते.
काळाच्या ओघात, विशेषतः पुन्हा उभारी घेतलेल्या भारतावर या हल्ल्यांची तीव्रता वाढली आहे. या पुस्तकात संकटांच्या वेळी माध्यमांची भूमिका हे एक मध्यवर्ती सूत्र म्हणून समोर येते. ज्यात कोविड-१९ या महामारीच्या वेळेतील परिस्थितीवर विशेष प्रकाश टाकला आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
एक अत्यंत भावपूर्ण पुस्तक आहे, जे वाचकाला भूतकाळाचा विचार करण्यास आमंत्रित करतात, भारतीयांच्या जिवंत मानवी कथा सांगून तिला भुरळ घालतात असे प्रा. मोहन राव यांनी या पुस्तकाबद्दल लिहीले आहे. या पुस्तकाची किंमत 599 इतकी आहे, पण तूम्हाला हे amazon वर केवळ 435 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
भारत हा एक अत्यंत वैविध्यपूर्ण देश आहे, जिथे अनेक वेगवेगळ्या गोष्टी, एकमेकांपासून फार वेगळ्या श्रद्धा, विविध रीतीरिवाज आणि मतांच्या खऱ्या अर्थाने मेजवानी अनुभवायला मिळते. 'दि आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन' या पुस्तकात नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्या निवडक लेखनांचा एक प्रकाशदायी संग्रह सादर केला आहे.
या पुस्तकात आधुनिक भारताला त्याच्या दीर्घकाळ चालत आलेल्या वादात्मक परंपरेच्या प्रकाशात समजून घेण्याची आवश्यकता विशद करतात. हे पुस्तक मुलांना भेट करू शकता.
खालील लिंकवर क्लिक करून हे पुस्तक खरेदी करा.
द एलिफंट मूव्ह्स' ही भारताच्या आर्थिक प्रवासाची स्पर्धात्मकतेच्या दृष्टिकोनातून मांडलेली एक आकर्षक गाथा आहे. आर्थिक इतिहास उलगडण्याचे हे मूळ आहे. भारत 2047 पर्यंत एक विकसित अर्थव्यवस्था कशी होईल, याची कल्पना करताना हे पुस्तक रोजगारनिर्मिती, धोरणांची अंमलबजावणी, आणि समृद्धीचे समान वाटप या आव्हानांचा विचार करते. हे सर्व सामायिक मूल्य, सामाजिक प्रगती आणि समृद्धी या मूलभूत तत्त्वांवर आधारित मार्गदर्शक तत्वांद्वारे साध्य करता येते, असं हे पुस्तक मांडते.
हे पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
'द लास्ट हीरोज' या पुस्तकात स्वातंत्र्यलढ्यातील या पायदळाच्या सैनिकांनी त्यांच्या कहाण्या सांगितल्या आहेत. या पुस्तकात दाखवले गेलेले पुरुष, महिला आणि मुले, आदिवासी, दलित, इतर मागासवर्गीय, ब्राह्मण, मुस्लिम, शीख आणि हिंदू आहेत.
सामान्य माणसांनी शेतकरी, कामगार, गृहिणी, जंगलातील उत्पन्न गोळा करणारे, कारागीर आणि इतरांनी, ब्रिटिश सत्तेच्या विरोधात उभे ठाकले. हे पुस्तक तूम्हाला 323 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
इंडियाज फॉरगॉटन कंट्री (India's Forgotten Country) हे पुस्तक बेला भाटिया यांनी लिहिले आहे. हे पुस्तक भारतातील सामाजिक व्यवस्थेच्या कडेला ढकलल्या गेलेल्या लोकांच्या जीवन आणि त्यांच्या संघर्षांवर केंद्रित आहे.
या पुस्तकात भाटिया यांनी भारताच्या ग्रामीण भागांतील वस्त्या, खेडी आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या कठीण जीवनाचा आणि दलित, आदिवासी, मजूर, महिला आणि इतर वंचित गटांवर राज्य करणाऱ्या दडपशाही शक्तींचा सखोल वेध घेतला आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.