सकाळ डिजिटल टीम
छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांच्या जन्म पुरंदर किल्ला येथे १४ मे १६५७ झाला होता.
संभाजी राजे हे अत्यंत हुशार होते. त्यांना अनेक भाषांचे ज्ञान होते, तसेच संस्कृत भाषेवर विशेष प्रभूत्व मिळवले होते. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी त्यांनी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला.
संभाजी महाराज गडावर बसून राज्यकारभार करण्यातले नव्हते. त्यांनी रणांगणात उतरत असंख्य वेळा शत्रूविरोधात जोरदार लढाई केली.
छत्रपती संभाजी महाराज हे राज्यकारभारात निपूण आणि कुशल संघटक होते. शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजांनीही अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली होती.
युध्दात शत्रूविरोधात गनिमी काव्याचा जोरदार वापर करत त्यांनी शत्रूंना धूळ चारली. त्यांच्या युध्द या कौशल्याच्या जोरावर त्यांनी शत्रुंना झुंजवत ठेवलं.
संभाजी राजेंच्या परक्रमाबद्दल बोलावे तितके कमी पडेल.राजेनी आपल्या कारकिर्दीत सुमारे १२० युद्धे केली. मात्र, एकाही लढाईत ते कधीही पराभूत झाले नाहीत.
१६८९ च्या सुरवातीला छत्रपती संभाजी राजेंचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला करत राजेंना पकडलं.
औरंगजेबाने केलेले अत्याचार ४० दिवस सहन केल्यानंतर फाल्गुन अमावास्येला संभाजी महाराजांची प्राणज्योत मालवली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.