छत्रपती शिवरायांची आज जयंती आहे, जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला
त्यांनी खेड्यापाड्यातील, गोरगरिबांच्या पोरांना घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली
त्यांनी वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी पुण्याच्या नैऋत्याला असलेल्या रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ घेतली
अवघ्या हातावर मोजण्याएवढ्या मावळ्यांसहित शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला पहिल्यांदा जिंकून घेतला
पुढे या स्वराज्याचा विस्तार करत जवळपास साडेतीनशे किल्ले स्वराज्यात आणले
पुढे महाराजांच्या निधनानंतर मराठ्यांनी सध्याच्या पाकिस्तानातील अटकेपर्यंत स्वराज्याच्या सीमा वाढवल्या
दिल्लीच्या तख्तावरसुद्धा मराठ्यांनी अनेक वर्षे राज्य केलं.