सर्वबाजूंनी संघटन कौशल्य उत्कृष्ट असणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे आहेत.
उत्तम नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी ही त्यांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाची गोष्ट होती.
प्रत्येक स्त्रीचा आदर करायचा अशा सूचना त्यांनी नेहमीचं मावळ्यांना दिल्या.
योग्य माणसाची निवड करून त्याच्या क्षमतेनुसार जबाबदारी द्यायची, हा उत्कृष्ट नेतृत्व गुण त्याच्यांकडून शिकण्यासारखा आहे.
अतिशय संयमाने प्रभावी निर्णय घेणे हा गुण त्यांचे चरित्र वाचल्यानंतर लक्षात येते.
छत्रपती शिवाजी महाराजांकडून अनेक गुण शिकण्यासारखे आहेत पण आत्ताच्या बेरोजगार तरुणांनी त्यांचं आर्थिक नियोजन सुद्धा वाचलं पाहिजे.
मोहीम फत्ते करून शत्रूला थांग पत्ता न लावता ते यशस्वी परत यायचे.
स्वराज्य फक्त तलवारीच्या धारेवर नाही तर बौद्धिक क्षमतेवर सुद्धा किती महत्त्वाचे असते हे त्यांना वाचल्यावर लक्षात येते.
तीळभर सुद्धा कल्पना नसणाऱ्या कठोर प्रसंगाला धाडसाने सामोर जाणं हे महाराजांकडून शिकण्यासारखं आहे.