नागपूर : आंतरराष्ट्रीय कथाकार आणि अध्यात्मिक गुरु देवकीनंदन ठाकूर (Guru Devkinandan Thakur) महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
जोपर्यंत सनातनी बहुसंख्य आहेत, तोपर्यंत भारत धर्मनिरपेक्ष देश असेल.
ज्या दिवशी सनातनी अल्पसंख्याक होतील, त्या दिवशी भारत धर्मनिरपेक्ष देश म्हणून टिकणार नाही.
त्यामुळं लोकसंख्या नियंत्रण कायदा येईपर्यंत प्रत्येक सनातनी (Sanatani) व्यक्तीनं पाच ते सहा मुलं जन्माला घालायला हवी, असं वादग्रस्त वक्तव्य देवकीनंदन ठाकुर यांनी केलं.
ते नागपुरात बोलत होते. यावेळी त्यांनी सनातन मंडळ स्थापन करण्याची मागणीही केली. एवढंच नाही, तर या मंडळात केवळ धर्माचार्यच असतील, असंही म्हटलं.
देवकीनंदन ठाकुर म्हणाले, लोकसंख्येवर आजपर्यंत नियंत्रण येऊ शकलेले नाही. लोकसंख्येचा केवढा मोठा स्फोट झाला आहे, याची कल्पनाही कुणी करू शकत नाही.
4 बायका आणि 40 मुलांसारख्या प्रकरणांवर कुणीही बोलत नाही. स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठे आक्रमण सनातन धर्मावरच झालं आहे.