Weight loss: भूक लागल्यावर हे पदार्थ खाल्लात, तर वाढणार नाही वजन

धनश्री ओतारी

कोणताही पदार्थ खाताना आजकाल पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे ”वजन वाढलं तर ?

पण काही असे पदार्थ आहेत जे खाल्यानंतर वजन वाढणार नाही.

घरी बनवलेल्या पनीरमध्ये कॅल्शिअम, व्हिटामिन बी, आणि फॉस्फोरस हे घटक असतात आणि त्यामुळे प्रथिनांचे प्रमाण वाढते आणि भूक कमी होते.

तेलबिया म्हणजे अशा बिया ज्यात तेलाचं प्रमाण मुबलक असतं. कलिंगडाच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया या बिया वजन वाढू देत नाहीत.

वजन कमी करायचं आहे पण उपाशी राहणं जमत नाही? मग तुमच्यासाठी सूप, मटणाचा रस्सा हे उत्तम पर्याय आहेत.

फॅटी मासे खाल्यामुळे भरपूर पोषणमुल्ये आपल्या शरीराला मिळतात. आणि प्रथिने मिळून भूक कमी होते. आणि वजनही नियंत्रणात राहतं.

तुम्ही त्यात मोड आलेली कडधान्ये वापरू शकता. किंवा नुसते मोडदेखील खाऊ शकता. त्याने तुमचं पोट तर भरेलच पण अतिरिक्त चरबी वाढायचे पण कारण राहणार नाही.

उकडलेले बटाटे थोडेसे मीठ किंवा सैंधव, चाट मसाला भुरभुरवून खाल्ला की चव पण चां लागते शरीराला आवश्यक असलेली उर्जा मिळते आणि वजन वाढायचा धोका पण राहत नाही.

फळं हा आरोग्यपूर्ण आहाराचा खूप मोठा घटक आहे. त्यातल्या त्यात सफरचंद तर अतिशय उत्तम मानलं जातं. त्यात असलेले पेक्टिन आपली पचनशक्ती वाढवते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.