''अखेर तुझ्यात जीव रंगलाच'' म्हणत हार्दिक अक्षयाचे लग्न अखेर पुण्यामध्ये पार पडले.
या सोहळ्यासाठी हार्दिक अक्षयाने पर्पल कलरची ड्रेसिंग केली होती.
लग्नानंतर अत्यंत दणक्यात त्यांचे रिसेप्शन झाले.
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील सर्व कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.
अक्षया- हार्दिकचा लग्नसोहळा हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
पण मालिकेतले राणा दा आणि पाठक बाई खऱ्या आयुष्यात एकत्र आल्याने चाहते मात्र प्रचंड खुश आहेत.