Naan Roti: औरंगाबादच्या प्रसिद्ध नान रोटीचा इतिहास...

| Sakal

औरंगाबाद शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर म्हणून ओळखलं जातं. शहरामध्ये मोहमंद-बीन-तुघलक यांच्या काळामध्ये सैन्यासोबत आलेली नान रोटी प्रसिद्ध आहे. 

| Sakal

औरंगाबादकरांना या नान रोटीने भुरळ घातली आहे.मुस्लिम कुटुंबांमध्ये कोणताही समारंभ असो नान रोटीला मोठी मागणी असते.

| Sakal

औरंगाबाद शहराने नगरची निजामशाही, मोगलशाही आणि नंतर हैदराबादची निजामशाही अशा शाही सल्तनती पाहिल्या.

| Sakal

मोहमंद-बीन-तुघलक यांच्या सैन्याच्या जेवणाची व्यवस्था व्हावी. यासाठी नान रोटी हा पदार्थ त्यांनी सैन्याच्या जेवणासाठी समाविष्ट केला होता.

| Sakal

ही नान रोटी खाल्ल्यानंतर दिवसभर जेवणाची गरज भासत नाही. स्पेशल खलियासोबत नान रोटी खाली जाते. नान रोटीचे एक वैशिष्ट्य म्हणजे ती लवकर खराब होत नाही. 

| Sakal

गव्हाचे पीठ, रवा, मैदा, सोडा, ईस्ट पावडर, बडीशेप, हळद, मीठ, यापासून नान रोटी तयार केली जाते.

| Sakal