वास्तूशास्त्रात वेगवेगळ्या गोष्टींतून भरभराटीचे मार्ग दाखवले आहेत.
त्यातीलच एक भाग म्हणजे घराचं प्रवेशद्वार. प्रवेशद्वारावर काही गोष्टी करणं उपयुक्त ठरतं.
त्यामुळे घर सुखसमृद्धीने भरलेलं राहतं आणि घरातल्या लोकांची प्रगती होते.
घराच्या मुख्य दारावर गणेशाची मूर्ती किंवा फोटो लावावा. त्यामुळे घरात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात.
घराच्या प्रवेशद्वाराला तोरण लावावे. यामुळे नकारात्मक शक्तीचा घरात प्रवेश होत नाही.
लक्ष्मीचे चरण घराच्या दिशेने लावावे. हे सुख-समृद्धीचे प्रतिक असते.
घरात कलह वाढले असतील तर शनिवारी काळ्या धाक्यात लिंबू मिरची ओवून ते मुख्य दाराला बांधावे. घरात शांतता नांदते.