खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंह याला त्याच्या चिथावणीखोर भाषणामुळे त्याला केंद्रीय तपास संस्थांकडून अटक करण्यात आली आहे.
अमृतपाल सिंग खालसा दुबईमध्ये ट्रान्सपोर्टचं काम करत होता. शेतकरी आंदोलनादरम्यान तो भारतात आला होता.
त्यानंतर नंतर पंजाब आवडू लागले अन् तो धार्मिक बनला. केंद्रीय तपास यंत्रणांनी त्याच्या चिथावणीखोर भाषणांचे संकलन केले आहे.
त्याने आपल्या भाषणातून वेगळा खलिस्तान पाहिजे अशी मागणी केली आहे. मागच्या ४ ते ५ महिन्यात त्याला चांगली लोकप्रियता मिळाली आहे.
तो सध्या धार्मिक लीडरच्या रूपात उदयास आला असून गावागावांत त्याची पकड वाढताना दिसत होती.
केंद्र सरकारने कृषी कायदे परत घेतल्यानंतर अमृतपालसिंग परत दुबईत गेला होता, त्यानंतर तो ऑगस्ट २०२२ मध्ये परत पंजाबमध्ये आला
दीप सिद्धू याने स्थापन केलेल्या 'वारिस पंजाब दे' या संघटनेचं काम दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर अमृतपालसिंह खालसा पाहू लागला. त्यानंतर दीप सिद्धूच्या भावाने अमृतपाल खालसा याची 'वारिस पंजाब दे' ही संघटना दीप सिद्धूच्या 'वारिस पंजाब दे'पेक्षा वेगळी असल्याचं त्याने सांगितलं.