रोहित कणसे
भारत आजपासून सुरू झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाशी भिडणार असून संघाची कमान रोहित शर्माच्या हातात असणार आहे.
रोहित शर्मा पहिल्यांदाच परदेशात कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून दिसणार आहे.
२०१८ सालापासून भारतीय संघाने रोहितच्या नेतृत्वाखाली भारताबाहेर ३९ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये एकदिवसीय आणि टी-20चा समावेश आहे.
भारताने ३९ पैकी २६ सामने जिंकले असून १३ सामने गमावले आहेत.
रोहित प्रथमच घरापासून दूर कसोटी सामन्यात कर्णधार असणार असल्याने कांगारूंविरुद्धची ही फायनल रोहितसाठी आणखी आव्हानात्मक बनली आहे.
रोहित आतापर्यंत भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी कर्णधार ठरला आहे.
भारतात रोहितच्या नेतृत्वाखाली संघाने सहा सामने खेळले आहेत ज्यापैकी चार मध्ये विजय मिळाला आहे तर एक सामना गमावला आणि एक ड्रॉ झाला.
सहापैकी चार सामने ऑस्ट्रेलियाविरोधात खेळले असून सर्व मॅच बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये याच वर्षी २०२३ मध्ये खेळले गेलेत
रोहित शर्माने आतापर्यंत एकूण ८३ मॅचमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे.
या पैकी रोहितला ६२ सामने जिंकलेत तर २० सामन्यात पराभव स्वीकारावा लागला, तर एक सामना ड्रॉ झाला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.