Pranali Kodre
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ या कसोटी मालिकेतील पाचव्या कसोटीत भारताने ६ धावांनी थरारक विजय मिळवला.
भारताने हा सामना जिंकल्याने ५ सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत संपली. ही मालिका अत्यंत चुरशीची झाली.
या मालिकेत अनेक अनोखे विक्रम झाले. या मालिकेला ऐतिहासिक ठरवणाऱ्या खास विक्रमांबद्दल जाणून घेऊ.
या मालिकेत पाच सामन्यात मिळून ७१८७ धावा झाल्या. त्यामुळे ही दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा झालेली मालिका ठरली.
भारतीय संघाने पहिल्यांदाच कसोटी मालिकेतील पाचवा सामना जिंकला आहे.
या मालिकेत ५ सामन्यांतील १९ डावांपैकी तब्बल १४ डावांमध्ये ३०० पेक्षा अधिक धावा झाल्या. हा देखील एक विक्रम आहे.
पहिल्यांदाच एका कसोटी मालिकेत दोन्ही संघांकडून मिळून ९ फलंदाजानी ४०० हून अधिक धावा केल्या.
या संपूर्ण मालिकेत ५० वेळा फलंदाजांनी ५० धावांचा टप्पा ओलांडला.
या मालिकेत दोन्ही संघांकडून २१ शतके झळकावण्यात आले. कसोटीमध्ये दुसऱ्यांदाच असं झालं. याआधी १९५५ मध्ये वेस्ट इंडिज - ऑस्ट्रेलिया मालिकेत २१ शतके झाली होती.
या मालिकेत भारत - इंग्लंड दोन्ही संघांकडून १० वेळा १५० धावांची भागीदारी झाली, हे देखील कसोटीत पहिल्यांदाच घडलं.
भारतीय संघाने इतिहासातील सर्वात कमी ६ धावांनी विजय याच मालिकेतील शेवटच्या सामन्यात मिळवला.
इंग्लंडने मालिकेतील पहिल्या सामन्यात त्यांच्या इतिहासातील सर्वाधिक ३७१ धावांचा यशस्वी पाठलाग केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.