सकाळ डिजिटल टीम
टीव्ही मालिका आणि अनेक चित्रपटांत काम करणारी अभिनेत्री दीपशिखा नागपालनं तिच्या अभिनय कारकिर्दीत खूप नाव कमावलं, पण तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप दुःख सोसावं लागलं.
1993 मध्ये टीव्हीच्या दुनियेत प्रवेश केल्यानंतर अभिनेत्री दीपशिखानं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. यामध्ये शाहरुख खानचा 'बादशाह', 'बेताज बादशाह', 'करण अर्जुन' आणि 'कोयला' सारखे सुपरहिट चित्रपट आहेत.
अभिनेत्रीनं वयाच्या 20 व्या वर्षी अभिनेता जीत उपेंद्रसोबत लग्न केलं. मात्र, हे लग्न फक्त 10 वर्षेच टिकलं. यातून अभिनेत्रीला दोन मुलंही झाली.
पहिल्या लग्नापासून घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री दुसऱ्यांदा प्रेमात पडली आणि दीपशिखानं 2012 मध्ये पुन्हा एका अभिनेत्याशी लग्न केलं. ज्याचं नाव केशव अरोरा आहे. पण, हेही लग्न फक्त 4 वर्षे टिकलं.
एका न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री दीपशिखा नागपालनं तिच्या भावना व्यक्त करताना म्हटलंय, की मला आता जोडीदाराची उणीव जाणवत आहे. ती खूप दुखी असल्याचंही सांगत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.