रोहित कणसे
रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाचे फॅन्स अनेक वर्षांपासून आयपीएल ट्रॉफीची वाट पाहात आहेत.
आरसीबीला आयपीएलमध्ये खेळण्यास सुरूवात करून १६ वर्ष झाले आहेत, पण अजूनही संघाला एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाहीये.
विशेष बाब म्हणजे या संघात नेहमी जगभरातील टॉप प्लेअर्स खेळत आले आहेत, तरी देखील आरसीबीला ट्रॉफी उंचावता आलेली नाहीये.
आरसीबीचे फॅन्स दरवर्षी संघाच्या विजयाकडे डोळे लावून बसतात, मात्र दरवर्षी त्यांच्या पदरी निराशाच पडताना पाहायला मिळते.
आता ChatGPT ने आरसीबी फॅन्सना त्यांचा फेवरेट संघ आयपीएल ट्रॉफी कधी जिंकेल याबद्दल अंदाज वर्तवला आहे.
एका रिपोर्टनुसार या एआय टूलने प्रिडिक्ट केलं आहे की रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू २०२९ साली आयपीएल ट्रॉफी जिंकू शकते.
यासोबतच गुगलच्या Gemini ने कोणते फॅक्टर्स संघाच्या विजयासाठी महत्वाचे फॅक्टर ठरू शकतात याबद्दल माहिती दिली आहे.
एआयनुसार टीममध्ये अनुभवी आणि नव्या खेळाडूंचे कॉम्बिनेशन आणि चांगला कर्णधार जिंकण्यासाठी आवश्यक आहे.
Geminiने विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांची खेळी सर्वात महत्वाची असेल तसेच चांगल्या संघाची निवड आणि नशीब यांना देखील महत्व असल्याचे म्हटले आहे.
चार वर्षांनंतर शिवम दुबेने घेतली IPL मध्ये विकेट!
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.