Shubham Banubakode
नारळपाणी शरीराला हायड्रेट ठेवते. हे पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम, अमिनो अॅसिड आणि अँटिऑक्सिडंट्चा महत्त्वाचा स्त्रोत आहे.
नारळपाणी पिणं फायदेशीर असले तरी, त्यानंतर काही गोष्टी खाल्ल्यास शरीराचं नुकसान होऊ शकते.
नारळपाण्यात पोटॅशियम असते. पिण्याच्या लगेच नंतर जास्त मीठ खाल्ल्यास शरीरात असंतुलन निर्माण होऊन त्रास होऊ शकतो.
नारळपाणी शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते. त्यानंतर लगेच जास्त पाणी प्यायल्यास पोट फुगण्याची शक्यता असते.
नारळपाणी प्यायल्यानंतर संत्री, लिंबू यासारख्या आंबट फळांचं सेवन करणं टाळावे. यामुळे अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
दह्यात लॅक्टिक अॅसिड असते. नारळपाणी प्यायल्यानंतर दही खाल्ल्यास पचनसंस्थेला त्रास होऊ शकतो.
नारळपाणी स्वतःच थंड असते. त्यानंतर थंड पदार्थ खाल्ल्यास सर्दी-खोकल्याचा धोका वाढतो.
नारळपाणी प्यायल्यानंतर तळलेले किंवा जड पदार्थ खाणे टाळा. यामुळे पचनक्रिया मंदावू शकते आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो.
कॉफी किंवा चहासारखी कॅफिनयुक्त पेये नारळपाणी प्यायल्यानंतर लगेच घेऊ नयेत. यामुळे शरीरातील पोषक तत्त्वांचे शोषण कमी होऊ शकते.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. नारळपाणी प्यायल्यानंतर काय खावे किंवा टाळावे, याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.