पेशव्यांनी कसा जिंकला रायगड? शिवरायांच्या सिंहासनावर उधळली चांदीची फुले अन्...

Shubham Banubakode

स्वराज्याची राजधानी

रायगड स्वराज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. मे 1656 मध्ये शिवाजीराजांनी चंद्रराव मोरे यांच्याकडून हा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचा गौरवशाली इतिहास येथून सुरू झाला.

How Peshwas Recaptured Raigad Fort | esakal

मुघलांचा ताबा

छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर 3 नोव्हेंबर 1689 मध्ये रायगड किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. स्वराज्यासाठी हा मोठा धक्का होता.

How Peshwas Recaptured Raigad Fort | esakal

पुन्हा स्वराज्यात सामील

छत्रपती शाहू महाराजांच्या आदेशाने 5 जून 1733 मध्ये रायगड पुन्हा स्वराज्यात सामील झाला. यामुळे मराठ्यांचा आत्मविश्वास वाढला.

How Peshwas Recaptured Raigad Fort | esakal

पोतनीसांचे बंड

शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर किल्ल्याचे हवालदार पोतनीस मराठ्यांविरुद्ध बंडखोर झाले. त्यांनी रामराजांच्या आदेशाचे पालन न करता रायगड पेशव्यांना देण्यास नकार दिला.

How Peshwas Recaptured Raigad Fort | esakal

रायगड पुनर्ताब्यात

थोरले माधवराव पेशव्यांनी रायगड ताब्यात घेण्यासाठी मोहीम सुरू केली. नारायणराव पेशव्यांनी सरदार आप्पाजी हरी यांच्या नेतृत्वाखाली 18 मार्च 1773 मध्ये ही मोहीम यशस्वी केली आणि रायगड तिसऱ्यांदा स्वराज्यात आला.

How Peshwas Recaptured Raigad Fort | esakal

ऐतिहासिक दरबार

रायगड ताब्यात घेतल्यानंतर आप्पाजी हरी यांनी सर्व सरदारांसह महाराजांच्या तख्तास मुजरा केला. फक्त पाच रुपये आणि रुप्याची फुले सिंहासनावर अर्पण करून तख्तास पागोट्याची झालर लावली गेली.

How Peshwas Recaptured Raigad Fort | esakal

शिवरायांच्या काकींचा वाडा! आजही 'या' गावात राहतात छत्रपतींचे वारसदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj's Aunt’s Legacy in Mungi | esakal
हेही वाचा -