Shubham Banubakode
इंदौरी पोहे आज संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. त्यांचा अनोखा चव आणि मसालेदार स्वाद यामुळे प्रत्येकजण त्याचा चाहता आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? या स्वादिष्ट पदार्थाची खरी ओळख मराठ्यांमुळे झाली!
16 व्या शतकात इंदौर हा माळवा प्रांताचा भाग होता. त्यावेळी या भागावर मुघलांचे राज्य होते. मुघल साम्राज्याने या प्रदेशावर आपली पकड मजबूत ठेवली होती.
17व्या शतकाच्या सुरुवातीला मुघल साम्राज्य कमकुवत होऊ लागले. याच काळात मराठ्यांनी आपला प्रभाव वाढवण्यास सुरुवात केली आणि माळवा प्रांतावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
मराठ्यांनी माळवा प्रांतात आपली सत्ता प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. त्यांच्या रणनीती आणि शौर्यामुळे मुघलांचे वर्चस्व कमी होत गेले.
१७२४ मध्ये पहिले पेशवे बाजीराव यांनी मावळ प्रांताची सुभेदारी मल्हारराव होळकर यांना दिली. यामुळे मराठ्यांचा प्रभाव आणखी वाढला.
१७३७ मध्ये मल्हारराव होळकर यांनी इंदौरमध्ये मराठा साम्राज्यांतर्गत होळकर घराण्याची सत्ता स्थापन केली. यामुळे इंदौर मराठा साम्राज्याचा महत्त्वाचा केंद्रबिंदू बनले.
मराठ्यांनी आपल्या संस्कृतीसह पोहे हा पदार्थ इंदौरमध्ये आणला. स्थानिकांनी यात जिरवण मसाला आणि अनारदाणा, शेव यांसारखे खास पदार्थ मिसळून त्याला अनोखी चव दिली.
या स्थानिक बदलांमुळे इंदौरी पोहे नावाने हा पदार्थ देशभर प्रसिद्ध झाला. आज इंदौरी पोह्यांचा स्वाद प्रत्येक शहरात आवडीने चाखला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.