डॉक्टर रात्री उशिरा पोस्टमॉर्टम का करत नाहीत? जाणून घ्या कारण

अंकिता खाणे (Ankita Khane)

संशयास्पद परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की खरे कारण शोधण्यासाठी डॉक्टर आणि फॉरेन्सिक टीम मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करतात.

पोस्टमॉर्टम हे देखील एक प्रकारचे ऑपरेशन आहे, ज्यामध्ये मृत व्यक्तीच्या शरीराची तपासणी करून मृत्यूचे खरे कारण शोधले जाते.

मात्र, कोणत्याही मृत व्यक्तीचे पोस्टमॉर्टम करण्यापूर्वी त्याच्या कुटुंबीयांची परवानगी घेणे आवश्यक आहे.

कितीही आपत्कालीन परिस्थिती असली तरी, पोस्टमॉर्टम कधीही रात्री केले जात नाही. या मागचे कारण जाणून घेऊया.

तज्ज्ञांच्या मते, मृत व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर 6 ते 8 तासांच्या आत त्याचे पोस्टमॉर्टम केले पाहिजे. यापेक्षा जास्त उशीर झाल्यास मृत्यूचे कारण निश्चित करणे कठीण होते.

मृतदेहांचे शवविच्छेदन करण्याची वेळ सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या दरम्यान असते. या आधी किंवा नंतर पोस्टमॉर्टम केले जात नाही.

रात्रीच्या वेळी ट्यूबलाइट किंवा एलईडीच्या कृत्रिम प्रकाशात जखमेचा रंग लाल ऐवजी जांभळा दिसतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

फॉरेन्सिक सायन्समध्ये जांभळ्या जखमांचा उल्लेख नाही. शवविच्छेदन अहवालाला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते कारण जखमांचा रंग नैसर्गिक आणि कृत्रिम प्रकाशात वेगळा दिसतो.

रात्री पोस्टमॉर्टम न करण्यामागे काही धार्मिक कारणे आहेत. याचे एक कारण म्हणजे अनेक धर्मांमध्ये रात्री अंत्यसंस्कार केले जात नाहीत.

ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणत्याही गोष्टीची पुष्टी करण्यासाठी तज्ञाचा सल्ला घ्या.

वारंवार उकळ्याने चहाचं होऊ शकतं विष; हिवाळ्यात घ्या विशेष काळजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

tea
येथे क्लिक करा