Pranali Kodre
मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२५ मध्ये १ मे रोजी राजस्थान रॉयल्सला जयपूरमध्ये पराभवाचा धक्का दिला.
मुंबई इंडियन्सचा हा आयपीएल २०२५ मधील सलग सहावा विजय होता.
मुंबई इंडियन्सने एकाच हंगामात सलग ६ सामने जिंकण्याची ही पहिलीच वेळ नाही.
यापूर्वी मुंबई इंडियन्सने २००८ आणि २०१७ साली देखील सलग ६ सामने जिंकले होते.
२००८ मध्ये सलग ६ सामने जिंकूनही मुंबई इंडियन्सला साखळी फेरीतून बाहेर व्हावे लागले होते.
मात्र २०१७ साली मुंबई इंडियन्सने् सलग ६ सामने जिंकण्याचा कारनामा करण्यासोबतच विजेतेपदही जिंकले होते.
याशिवाय मुंबईने २०१०, २०१३, २०१५ आणि २०२० या वर्षीही सलग ५ सामने जिंकले आहेत. यातील २०१० मध्ये मुंबई उपविजेते राहिले होते, तर २०१३, २०१५ आणि २०२० मध्ये मुंबईने विजेतेपद जिंकले होते.
म्हणजेच २००८ आणि २०१० हंगामाव्यतिरिक्त जेव्हाही मुंबईने ५ किंवा त्यापेक्षा अधिक सलग सामने जिंकलेत, तेव्हा त्यांनी विजेतेपदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे आताही मुंबई सहावे विजेतेपद मिळवेल अशी त्यांच्या चाहत्यांना आशा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.