Shubham Banubakode
रायगडाच्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं पाचाड गावाचं स्वराज्याच्या इतिहासात विशेष स्थान आहे.
याच गावात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मातोश्री राजमाता माँ जिजाऊंसाठी एक भव्य वाडा बांधला होता, आजही हा इतिहासाची साक्ष देतो.
हा वाडा २००x४० फूट आकाराचा असून यात हत्ती आणि घोडे बांधण्याची व्यवस्था होती. ८ ते १२ फूट उंच तटबंदी असलेला हा वाडा त्या काळातील स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना होता.
रायगडावरील थंड हवामान त्यांच्या प्रकृतीला मानवत नसल्याने शिवरायांनी पाचाड येथे हा वाडा बांधल होता. याच वाड्यात माँ जिजाऊंनी जीवनातील अखेरचे क्षण घालवले.
१८ जून १६७४ रोजी, वयाच्या ७८व्या वर्षी, याच ठिकाणी माँ जिजाऊंनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर पाचाड येथील ओढ्याकाठी त्यांच्यावर अग्निसंस्कार करण्यात आले.
याच वाड्यात त्यांचे स्मारक म्हणून एक लहान चौथऱ्यावर समाधी वृंदावन बांधण्यात आले.
पुढे मालोजीराव नाईक निंबाळकर यांनी या स्मारकाचा जीर्णोद्धार केला. आजही हे स्मारक इतिहासप्रेमींसाठी प्रेरणास्थान आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.